५ नोव्हेंबर ....आज मराठी रंगभूमी दिवस
“बाबू मोशाय, जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ में है जांहपनाह, उसे ना आप बदल सकते हैं ना मैं। हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं जिनकी डोर ऊपर वाले की उंगलियों में बंधी है। कब कौन कहां उठेगा ये कोई नहीं बता सकता। हा हा हा।"
किती सहजतेने ही वाक्ये उच्चारतो तो. त्याचा मित्रही मजेत रेकाॅर्ड करतो.
दोघेही जोरजोरात हसतात.... तो क्षण enjoy करतात.
तीच रेकाॅर्ड तो गेल्यावर परत लागते, जेव्हा त्याचा मित्र कोसळलेला असतो त्याच्या जाण्याने.क्षणभर तो मित्रच काय पण आपणही दचकतो! तो सीन अंगावर शहारे आणतो.तीच वाक्ये पण परिस्थिती अगदी उलट.
हा जगाचा रंगमंच खरोखर अजब आहे नाही!
नाटक लिहीलेलं तर असतं पण तालमी होत नाहीत.
भूमिका ठरलेली असते पण कलाकाराला माहीतच नसतं की आपल्या भूमिकेची लांबी किती, रुंदी किती!
Entry घेतली जाते, कला सादर व्हायला लागते अन् अचानक कधी तरी प्रेक्षक टाळ्या वाजवतात, तो आवाज कानात घुमत असतानाच अचानक होतो Black out! थोड्याच काळाकरता पण पूर्ण सीन बदलून टाकणारा. कलाकाराला जमीनीवर, वास्तवात आणणारा.
एखादा ती भूमिका पूर्णपणे जगतो तर कोणाला सतत प्राॅम्प्टरचा आधार लागतो.
कधी कोणाच्या नाटकाचा शतक महोत्सव तर कधी कोणाचे नाटक ३-४ प्रयोगात बंद.
कधी टुकार नाटक पण भन्नाट चालते तर कधी आशयघन नाटकाची हार होते.
कधी कोणी भूमिका तन्मयतेने करत राहतो तर कधी कोणी उन्मत्त होतो, ते नाटक, ती नशा चिरकाल असणार आहे या भ्रमात.
कधी कोणी हसवतो, हसतां हसता रडवतो. कधी कोणी उगाचाच आढ्यतेचे bearing घेउन पूर्णवेळ आकसून बसतो.
ते नाटक साजरे करायला जसा तो कलाकार महत्वाचा त्याचप्रमाणे त्याचे सहकलाकार, परिस्थितीनामक तांत्रिक बाबी सांभाळणारे back stage कलाकार,त्या नाटकांत रंग भरणारे निसर्गाचे,सणसमारंभांचे, सुखद दु:खद प्रसंगांचे संगीत अन् प्रकाशआणि या सर्वांना आपल्या तालावर नाचवणारा तो खेळीया!
फार कमी जण असतात की जे ह्या रंगमंचावर शतकानुशतके टिकेल असा ठसा उमटवून जातात, त्यांच्यासाठीच्या टाळ्यांचे अन् वाहवांचे आवाज कायम त्या रंगमंचावर गुंजत राहतात.
@अनघा पारखी
“बाबू मोशाय, जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ में है जांहपनाह, उसे ना आप बदल सकते हैं ना मैं। हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं जिनकी डोर ऊपर वाले की उंगलियों में बंधी है। कब कौन कहां उठेगा ये कोई नहीं बता सकता। हा हा हा।"
किती सहजतेने ही वाक्ये उच्चारतो तो. त्याचा मित्रही मजेत रेकाॅर्ड करतो.
दोघेही जोरजोरात हसतात.... तो क्षण enjoy करतात.
तीच रेकाॅर्ड तो गेल्यावर परत लागते, जेव्हा त्याचा मित्र कोसळलेला असतो त्याच्या जाण्याने.क्षणभर तो मित्रच काय पण आपणही दचकतो! तो सीन अंगावर शहारे आणतो.तीच वाक्ये पण परिस्थिती अगदी उलट.
हा जगाचा रंगमंच खरोखर अजब आहे नाही!
नाटक लिहीलेलं तर असतं पण तालमी होत नाहीत.
भूमिका ठरलेली असते पण कलाकाराला माहीतच नसतं की आपल्या भूमिकेची लांबी किती, रुंदी किती!
Entry घेतली जाते, कला सादर व्हायला लागते अन् अचानक कधी तरी प्रेक्षक टाळ्या वाजवतात, तो आवाज कानात घुमत असतानाच अचानक होतो Black out! थोड्याच काळाकरता पण पूर्ण सीन बदलून टाकणारा. कलाकाराला जमीनीवर, वास्तवात आणणारा.
एखादा ती भूमिका पूर्णपणे जगतो तर कोणाला सतत प्राॅम्प्टरचा आधार लागतो.
कधी कोणाच्या नाटकाचा शतक महोत्सव तर कधी कोणाचे नाटक ३-४ प्रयोगात बंद.
कधी टुकार नाटक पण भन्नाट चालते तर कधी आशयघन नाटकाची हार होते.
कधी कोणी भूमिका तन्मयतेने करत राहतो तर कधी कोणी उन्मत्त होतो, ते नाटक, ती नशा चिरकाल असणार आहे या भ्रमात.
कधी कोणी हसवतो, हसतां हसता रडवतो. कधी कोणी उगाचाच आढ्यतेचे bearing घेउन पूर्णवेळ आकसून बसतो.
ते नाटक साजरे करायला जसा तो कलाकार महत्वाचा त्याचप्रमाणे त्याचे सहकलाकार, परिस्थितीनामक तांत्रिक बाबी सांभाळणारे back stage कलाकार,त्या नाटकांत रंग भरणारे निसर्गाचे,सणसमारंभांचे, सुखद दु:खद प्रसंगांचे संगीत अन् प्रकाशआणि या सर्वांना आपल्या तालावर नाचवणारा तो खेळीया!
फार कमी जण असतात की जे ह्या रंगमंचावर शतकानुशतके टिकेल असा ठसा उमटवून जातात, त्यांच्यासाठीच्या टाळ्यांचे अन् वाहवांचे आवाज कायम त्या रंगमंचावर गुंजत राहतात.
@अनघा पारखी
Comments
Post a Comment