वटपौर्णिमा
आजही न चुकतां आठवते ती माझ्या लहानपणीची वटपौर्णिमा!
आमच्याइथल्या पटेलांच्या वाड्यात असलेल्या वडाला पूजायला सगळ्या गृहिणी नटून थटून यायच्या.आई आणि आजीबरोबर मीसुद्धा छान आवरुन, गजरे घालून( गजरा पिनेने केसात लावून तो कपाळावर रूळत ठेवण्याची ती fashion अनेकींना आठवत असेल)हातात फुले किंवा पाण्याचा तांब्या घेउन जायचे.
सगळ्याजणी मनोभावे पूजा करायच्या.
हे असेच का? तसेच का? आम्हीच का करायचा उपवास?
नवरेमंडळींनी का नाही? सात जन्म कोणी पाहिलेत वगैरे वगैरे विचार नसायचेच तिथे.
असायची फक्त श्रद्धा(अंधश्रद्धा नव्हे)!
कारण तेव्हा आपल्या आई-आजी फक्त नवराच मागत नसाव्यात बहुदा. पूजा करताना नवरेमंडळींबरोबरच सासर-माहेरची तीच माणसे त्यांच्या नजरेसमोर असावीत.ह्यातली सर्वच त्यांना जपणारी, समजून घेणारी होतीच असे नाही. पण ती त्यांची आपली माणसे होती.त्यांनी तिला आणि तिने त्यांना जसे आहे तसे स्वीकारले होते.
म्हणूनच पूजा करताना एक मंगल वातावरण असायचे.
शास्त्रार्थ , सायन्स वगैरे बाबी गौण होत्या त्यांच्याकरता.
कदाचित त्यामुळेच नाती घट्ट होती, त्याची वीण मजबूत होती. वेळप्रसंगाला धावून येणारे अनेक हात होते. जर कोणी मनाने, शरीराने खचलाच तर आधार द्यायला अनेक खांदे होते.
प्रत्येक सणसमारंभ हा आनंदासाठीच असतो हा विश्वास होता.
त्या पिढीच्या दीर्घायुष्याच्या अनेक रहस्यांपैकी हे एक महत्वाचे रहस्य होते नाही का?
ता.क.: आम्हा लहान मुलांना साबुदाणा खिचडी, भगर आमटी, उपासाची बटाटा भाजी, तळलेल्या पापड्या यांचा आणि पुढचे ७ जन्म आपल्याला तेच आई- बाबा , आजी- आजोबा मिळणार याचा आनंद असायचा.
अनघा पारखी
आजही न चुकतां आठवते ती माझ्या लहानपणीची वटपौर्णिमा!
आमच्याइथल्या पटेलांच्या वाड्यात असलेल्या वडाला पूजायला सगळ्या गृहिणी नटून थटून यायच्या.आई आणि आजीबरोबर मीसुद्धा छान आवरुन, गजरे घालून( गजरा पिनेने केसात लावून तो कपाळावर रूळत ठेवण्याची ती fashion अनेकींना आठवत असेल)हातात फुले किंवा पाण्याचा तांब्या घेउन जायचे.
सगळ्याजणी मनोभावे पूजा करायच्या.
हे असेच का? तसेच का? आम्हीच का करायचा उपवास?
नवरेमंडळींनी का नाही? सात जन्म कोणी पाहिलेत वगैरे वगैरे विचार नसायचेच तिथे.
असायची फक्त श्रद्धा(अंधश्रद्धा नव्हे)!
कारण तेव्हा आपल्या आई-आजी फक्त नवराच मागत नसाव्यात बहुदा. पूजा करताना नवरेमंडळींबरोबरच सासर-माहेरची तीच माणसे त्यांच्या नजरेसमोर असावीत.ह्यातली सर्वच त्यांना जपणारी, समजून घेणारी होतीच असे नाही. पण ती त्यांची आपली माणसे होती.त्यांनी तिला आणि तिने त्यांना जसे आहे तसे स्वीकारले होते.
म्हणूनच पूजा करताना एक मंगल वातावरण असायचे.
शास्त्रार्थ , सायन्स वगैरे बाबी गौण होत्या त्यांच्याकरता.
कदाचित त्यामुळेच नाती घट्ट होती, त्याची वीण मजबूत होती. वेळप्रसंगाला धावून येणारे अनेक हात होते. जर कोणी मनाने, शरीराने खचलाच तर आधार द्यायला अनेक खांदे होते.
प्रत्येक सणसमारंभ हा आनंदासाठीच असतो हा विश्वास होता.
त्या पिढीच्या दीर्घायुष्याच्या अनेक रहस्यांपैकी हे एक महत्वाचे रहस्य होते नाही का?
ता.क.: आम्हा लहान मुलांना साबुदाणा खिचडी, भगर आमटी, उपासाची बटाटा भाजी, तळलेल्या पापड्या यांचा आणि पुढचे ७ जन्म आपल्याला तेच आई- बाबा , आजी- आजोबा मिळणार याचा आनंद असायचा.
अनघा पारखी
Comments
Post a Comment