सामान्य व्यक्तींमधील वल्ली जगासमोर आणणारा खेळीया
(स्थळ: स्वर्गातील एक दालन,सर्वत्र सनईचे मंगलसूर ऐकू येत आहेत..देव गंधर्व आणि अप्सरादी मंडळी सुरेख शृंगार करून, उंची अत्तर लावून तयार होत आहेत. तेवढ्यात एक छोट्या चणीचे, तब्येतीने किरकोळ, डोळ्यांमध्ये निळसर झाक,डोक्यास टक्कल असे आजोबा थोड्या घाईतच येताना दिसतात)
अंतू बर्वा: ( अनुनासिक स्वर) अरे शिंच्या! नारायणा ! कुठे उलथला आहेस रे! सकाळी लवकर येणार होतास ना रे ? अरे नारोबा....
नारायण: ( आत कोणालातरी उद्देशून)ते साडीचे पाहतो मी.. पेशवाईमध्येच आॅर्डर दिलीय...अहो म्हणजे काय? भाईंची अर्धांगिनीचा मान नको का त्यांना!
(अंतूंना पाहून) अहो तुमच्याकडेच यायला निघालो होतो.
अं.ब: तू कसला येतोस वेळेत..१०० कामे एकट्याच्या उरावर घ्यायला सांगितलन् कुणी?द्यायचे एखादे काम इतरांना! क्काय?तो गटण्या कुठे उलथलाय? की बापाप्रमाणे प्रुफं तपासत बसलाय?
बरं बोलावणी गेली ना प्रत्येकाला?सूत्र संचालनाचं कोण बघतंय आणि?
नारायण: अहो,चितळे मास्तर! म्हणाले, “ज्याला हातात लेखणी धरायला शिकवले,त्याने त्याच लेखणीने अजरामर केले मला. मग त्याच्या जन्मशताब्दी वर्षाच्या आरंभाच्या कार्यक्रमासाठी जंगी सूत्रसंचालन करतो.”
अंतूशेठ,सख्याने .. म्हणजे गटणेने हो,त्याने तर पूर्ण हाॅल भाईंच्या प्रत्येक बुकातील अगदी बेश्ट अशा वाक्यांनी भरून टाकलाय.तुम्हाला सांगतो, तो मला
म्हणाला,”नारोपंत, सरांनी लिहिलेला प्रत्येक शब्द लाखमोलाचा आहे, त्यातील ठळक गोष्टी निवडणे म्हणजे ढिगभर तांदळाच्या राशीतून ठराविक असा तांदळाचा दाणा शोधून काढण्यासारखे आहे”
अं.ब:तो गंप्या पण स्वत: त्या नाम्या परटाबरोबर फिरून पडेल ती कामं करतोय शिंचा! अन् बापू काण्या, नेहमीसारखाच सेक्रेट्री.हॅं हॅं हॅं! स्वागतगीतासाठी मी आपल्या मंजू फुलराणीला सांगितलंय बरे का?
(तेवढ्यात समोरून एक पारशी बाबा येतात)
नारायण: अरे १००% पेस्तन काका? कसं क्काय बरंय ना?
पेस्तन काका: अरे साला तुमी लोग.. मी तुमच्या संगट वार्ता नाय करते.. अरे तो लखू रिसबूड, लै भला माणंस, तेनी मला बोल्ला की भाईंच्या birth century year चा starting program छे, म्हनूनश्यान मी आलो पडत पडत ...नायतर,तूमी साला मला विसरलेला!अरे पन ते भाई कुठे? ए साला, मी त्याला पयले wish करनार!
चितळे मास्तर: (आत येत येत)अरे भाई कुठेच नाहीये! सगळीकडे पाहिले आम्ही. शेवटी नंदा प्रधान गेलाय त्याची गाडी घेउन..तो बघ , तो आलाच!अरे कुठंय पुलं?
नंदा: एक मिनिट .... भाई इथे कुठेच नाहिये..
सगळे: मग?? कुठेत?
नंदा: पृथ्वीवर... अहो, ज्याने आपल्यासारख्या सामान्य माणसांना स्वत:च्या लेखणीचा परिसस्पर्श दिला,आपल्याला अजरामर केले, जो आयुष्यभर सामान्यातले असामान्यपण शोधून जगासमोर आणत राहिला, तो आजही तिथेच आहे.
सगळे: म्हणजे नक्की कुठे?
नंदा: तिथे ..जिथे मराठी माणूस आहे, जिथे मराठी भाषा आहे, जिथे साहित्याबद्दल प्रेम, आपुलकी आहे, जिथे अजुनही लहान मुलांना बालगीत शिकवताना ‘ नाच रे मोरा आंब्याच्या वनांत’ चा नंबर प्रथम लागतो ... भाई या सर्व ठिकाणी आहे.या जन्मशताब्दी वर्षाकरताच नव्हे तर जो पर्यंत मराठी भाषा आहे तोवर आपले महाराष्ट्राचे हे लाडके व्यक्तिमत्व त्या मराठी मनांतच असणार आहे, नांदणार आहे.
मी: भाई, आम्हाला माहित्येय की तुम्ही इथेच आहात आमच्यात.तुमच्या जन्मशताब्दी वर्षाकरीता हार्दिक शुभेच्छा!🙏🙏
@अनघा पारखी
(स्थळ: स्वर्गातील एक दालन,सर्वत्र सनईचे मंगलसूर ऐकू येत आहेत..देव गंधर्व आणि अप्सरादी मंडळी सुरेख शृंगार करून, उंची अत्तर लावून तयार होत आहेत. तेवढ्यात एक छोट्या चणीचे, तब्येतीने किरकोळ, डोळ्यांमध्ये निळसर झाक,डोक्यास टक्कल असे आजोबा थोड्या घाईतच येताना दिसतात)
अंतू बर्वा: ( अनुनासिक स्वर) अरे शिंच्या! नारायणा ! कुठे उलथला आहेस रे! सकाळी लवकर येणार होतास ना रे ? अरे नारोबा....
नारायण: ( आत कोणालातरी उद्देशून)ते साडीचे पाहतो मी.. पेशवाईमध्येच आॅर्डर दिलीय...अहो म्हणजे काय? भाईंची अर्धांगिनीचा मान नको का त्यांना!
(अंतूंना पाहून) अहो तुमच्याकडेच यायला निघालो होतो.
अं.ब: तू कसला येतोस वेळेत..१०० कामे एकट्याच्या उरावर घ्यायला सांगितलन् कुणी?द्यायचे एखादे काम इतरांना! क्काय?तो गटण्या कुठे उलथलाय? की बापाप्रमाणे प्रुफं तपासत बसलाय?
बरं बोलावणी गेली ना प्रत्येकाला?सूत्र संचालनाचं कोण बघतंय आणि?
नारायण: अहो,चितळे मास्तर! म्हणाले, “ज्याला हातात लेखणी धरायला शिकवले,त्याने त्याच लेखणीने अजरामर केले मला. मग त्याच्या जन्मशताब्दी वर्षाच्या आरंभाच्या कार्यक्रमासाठी जंगी सूत्रसंचालन करतो.”
अंतूशेठ,सख्याने .. म्हणजे गटणेने हो,त्याने तर पूर्ण हाॅल भाईंच्या प्रत्येक बुकातील अगदी बेश्ट अशा वाक्यांनी भरून टाकलाय.तुम्हाला सांगतो, तो मला
म्हणाला,”नारोपंत, सरांनी लिहिलेला प्रत्येक शब्द लाखमोलाचा आहे, त्यातील ठळक गोष्टी निवडणे म्हणजे ढिगभर तांदळाच्या राशीतून ठराविक असा तांदळाचा दाणा शोधून काढण्यासारखे आहे”
अं.ब:तो गंप्या पण स्वत: त्या नाम्या परटाबरोबर फिरून पडेल ती कामं करतोय शिंचा! अन् बापू काण्या, नेहमीसारखाच सेक्रेट्री.हॅं हॅं हॅं! स्वागतगीतासाठी मी आपल्या मंजू फुलराणीला सांगितलंय बरे का?
(तेवढ्यात समोरून एक पारशी बाबा येतात)
नारायण: अरे १००% पेस्तन काका? कसं क्काय बरंय ना?
पेस्तन काका: अरे साला तुमी लोग.. मी तुमच्या संगट वार्ता नाय करते.. अरे तो लखू रिसबूड, लै भला माणंस, तेनी मला बोल्ला की भाईंच्या birth century year चा starting program छे, म्हनूनश्यान मी आलो पडत पडत ...नायतर,तूमी साला मला विसरलेला!अरे पन ते भाई कुठे? ए साला, मी त्याला पयले wish करनार!
चितळे मास्तर: (आत येत येत)अरे भाई कुठेच नाहीये! सगळीकडे पाहिले आम्ही. शेवटी नंदा प्रधान गेलाय त्याची गाडी घेउन..तो बघ , तो आलाच!अरे कुठंय पुलं?
नंदा: एक मिनिट .... भाई इथे कुठेच नाहिये..
सगळे: मग?? कुठेत?
नंदा: पृथ्वीवर... अहो, ज्याने आपल्यासारख्या सामान्य माणसांना स्वत:च्या लेखणीचा परिसस्पर्श दिला,आपल्याला अजरामर केले, जो आयुष्यभर सामान्यातले असामान्यपण शोधून जगासमोर आणत राहिला, तो आजही तिथेच आहे.
सगळे: म्हणजे नक्की कुठे?
नंदा: तिथे ..जिथे मराठी माणूस आहे, जिथे मराठी भाषा आहे, जिथे साहित्याबद्दल प्रेम, आपुलकी आहे, जिथे अजुनही लहान मुलांना बालगीत शिकवताना ‘ नाच रे मोरा आंब्याच्या वनांत’ चा नंबर प्रथम लागतो ... भाई या सर्व ठिकाणी आहे.या जन्मशताब्दी वर्षाकरताच नव्हे तर जो पर्यंत मराठी भाषा आहे तोवर आपले महाराष्ट्राचे हे लाडके व्यक्तिमत्व त्या मराठी मनांतच असणार आहे, नांदणार आहे.
मी: भाई, आम्हाला माहित्येय की तुम्ही इथेच आहात आमच्यात.तुमच्या जन्मशताब्दी वर्षाकरीता हार्दिक शुभेच्छा!🙏🙏
@अनघा पारखी
Comments
Post a Comment